शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

शेतीपंपांच्या वीज जोडणीेस आॅगस्टपर्यंत सुरक्षा -एन. डी. पाटील : अडीच लाख जोडणीचा मार्ग मोकळा; बिल कमी होण्याची आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:23 IST

कोल्हापूर : राज्यातील ४१ लाख शेतीपंपधारकांच्या वीज बिलांची १५ आॅगस्ट २०१८पर्यंत तपासणी होऊन दुरुस्ती होईल. त्यानंतर अचूक बिलाच्या आधारेच नवीन कृषी संजीवनी योजना

कोल्हापूर : राज्यातील ४१ लाख शेतीपंपधारकांच्या वीज बिलांची १५ आॅगस्ट २०१८पर्यंत तपासणी होऊन दुरुस्ती होईल. त्यानंतर अचूक बिलाच्या आधारेच नवीन कृषी संजीवनी योजना राबविण्यात येईल. तोपर्यंत शेतीपंपधारकांची जोडणी (कनेक्शन) तोडली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फ डणवीस यांनी दिले आहे, अशी माहिती महाराष्टÑ राज्य इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्षप्रा. एन. डी. पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अडीच लाख शेतीपंपधारकांना जोडण्या मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी सांगितले.यावेळी प्रा. पाटील म्हणाले, शेतीपंपधारकांच्या मागण्यांसाठी फेडरेशनतर्फे २७ मार्चला मुंबईत मोर्चा काढण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोर्चाच्या शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा करून महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.यामध्ये राज्यातील ४१ लाख कृषिपंपधारक वीज ग्राहकांची वीज बिले १५ आॅगस्टपर्यंत तपासून दुरुस्त करण्यात येतील. त्यानंतर अचूक बिलाच्या आधारे नवीन कृषी संजीवनी योजना राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्यातील सर्व सहकारी पाणीपुरवठा संस्थांची बिले ही प्रतियुनिट १.१६ रुपये याप्रमाणेच ‘महावितरण’कडून भरून घेतली जाणार आहेत. त्याचबरोबर या सर्व उच्चदाब वीज ग्राहकांच्या बिलांमधील थकबाकी १५ आॅगस्टपर्यंत निकाली काढण्यात येईल. त्यामुळे या उन्हाळ्यासह आॅगस्टपर्यंत कोणत्याही शेतीपंपधारकाची जोडणी वीज बिलाअभावी तोडली जाणार नाही.प्रताप होगाडे म्हणाले, शेतीपंप वीज बिले तपासून दुरुस्त करण्याच्या निर्णयामुळे राज्यातील शेतकरी ग्राहकांची बिले जवळपास ५० टक्क्यांनी कमी होतील. यामुळे ‘महावितरण’चा बोगस कारभार समोर येणार आहे. सबसिडीच्या माध्यमातून शेतकरी ग्राहकांचे सर्व पैसे सरकारने ‘महावितरण’कडे भरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी महावितरणला एकही पैसा देणे लागत नाही. १५ टक्के गळती असल्याचे सरकारला मान्य करावे लागेल. यामुळे जवळपास साडेनऊ हजार कोटींचा महसूल हा भ्रष्टाचाराच्या माध्यमातून बाहेर गेला आहे, ते समोर येईल.ते पुढे म्हणाले, सरकारचे सबसिडीच्या माध्यमातून महावितरणला दुप्पट पैसे गेले आहेत. गेल्या वर्षभरात चार हजार ८०० कोटींची सबसिडी सरकारने भरली असून, त्यातून जवळपास २४०० कोटीरुपये कमी होतील. या कमीझालेल्या पैशांतून शेतकºयांचे पैसे भरणे शक्य होईल.यावेळी बाबासाहेब पाटील-भुयेकर, विक्रांत पाटील-किणीकर, आर. जी. तांबे, भगवान काटे, आर. के. पाटील, आदी उपस्थित होते.गेल्या चार ते पाच वर्षांपासून महावितरणकडे पैसे भरूनही शेतीपंपांच्या प्रलंबित असलेल्या जोडण्या देण्याचा निर्णयही मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील अडीच लाख शेतीपंपांच्या जोडण्या आता मिळणार आहेत.कोल्हापूर जिल्ह्यातील १० हजार, तर सांगलीतील २५ हजार जणांचा समावेश आहे, असे होगाडे यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी